घरगुती उपाय आपल्या सौंदर्य आणि स्वास्थ्यासाठी



आयुर्वेदाने मध्यतरीच्या काळात ओळख गमावली होती. आधुनिक विज्ञानाच्या शोधानंतर परत लोक आयुर्वेदिक इलाजा कडे वळू लागलेली आहे. अनेक कारणांनी आयुर्वेदाने लोकप्रिय केले आहे. त्यापैकी महत्वाचे आधुनिक औषधांप्रमाणे त्याचा कोणताही दुष्परिणाम नाही. दुसरी बाब, आयुर्वेद पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि, आयुर्वेद फक्त एका रोगाचा इलाज करण्याकडे लक्ष देत नाही तर तो संपूर्णपणे निर्मूलनासाठी केंद्रित करतो.

१.आपल्या चेहर्याला ताज्या टोमॅटोने रसाने मसाज करा आणि 1 , 2 तासांनंतर चेहरा धुवून घ्यावा. हा साधा आयुर्वेदिक उपाय पीपल्स सारख्या समस्या साफ करण्यात मदत करते आणि चेहऱ्यावर तेज आणण्यास मदत होते.

२. रोज सकाळी सफरचंदचा एक पेला रस प्या, आपली त्वचा चमकदार आणि सुंदर बनेल.

३. दररोज गरम पाणी आणि निंबू व मध हे पिण्याची सवय करा, नैसर्गिकरित्या वजन कमी होते.

४. कोरफडचा गर चेहर्याला लावून रोज मसाज केल्यास चेहऱ्यावरील काळे डाग निघतील.

५. नारळाचे तेल व लिंबाचा रस ह्याने १० ते १५ दिवस केसाची मालिश करा आपोआप केसातील कोंढा हि समस्या सुटण्यास मदत होईल..

६. पावसाच्या पाण्याने केस धुतल्यास केस चमकदार होतात.

७. तसेच कडूनिंबाचे २० ते ३० पाने टाकून पाणी उकळून घ्यावे आणि त्या पाण्याने केस धुतल्यास केसातील कोंढा काही दिवसात नाहीसा होता

८. जेवणानंतर भरपोट पाणी पिल्यास त्वचेवरील पिंपल्स (तारुण्यपिटिका) चालले जातात.

९. कडूनिंबाच्या रोज १ ते २ छोट्या गोळ्या बनवून खालल्या तर चेहरा,तब्येत आणि इतर अनेक गोष्टी सुधारतात.

१०. पुदिन्याने चेहऱ्याची मसाज करून तो लेप रात्र भर चेहऱ्यास लावून ठेवावा. ह्याने चेहरा ताजातवाना व चेहऱ्यावरील सौंदर्य खुलेल.

११. त्वचेला एरंडेल तेलाने मालिश केल्यास त्वचा लवचिक राहते.

१२. सकाळी उठल्याबरोबर १ ते २ ग्लास पाणी पिल्यास प्रातविधी साफ होते व त्वचा ताजीतवानी राहते.

१३.चेहरा गोरा करण्याकरितात झोपताना रोज गायीच्या शुद्ध तुपाने मालिश करा व सकाळी चेहरा धुतल्यानंतर फरक जाणवेलच.

१४.कपालभारती प्राणायाम रोज ५ मिनिट केल्यास त्वचेवरील तेज अबाधित राहते.

१५. सूर्यनमस्कार रोज करणे हे शरीरास त्वचेस लाभदायक आहे.

१६. शुद्ध बदाम तेल किंवा शुद्ध नारळ तेल आठवड्यातून दोनदा मसाज करा, आयुर्वेदिक नियमानुसार शरीरात रक्त प्रवाह वाढते आणि आधी नसलेली त्वचेवरील चमक परत आणते.

१७. आठवड्यातून एक किंवा दोन वेळेस उपास ठेवा आणि त्या दिवशी फक्त फळे व दुध घ्या शरीरातील अनोपयोगी तयार होणारे विषारी द्रव्य निघून जातात.

१८. चेहऱ्यावर शुद्ध मध बरोबर लिंबाचा रस लावावा, हे घरगुती उपाय मुरुमांपासून फार लवकर उपचाराकरिता उपयुक्त आहे.

१९. रोज तीन ते चार खजूर खालल्यास त्वचा चांगली राहते.

तुमचे प्रश्न आणि शंका आम्हाला पाठवण्यासाठी ajnayoganashik@gmail.com किंवा +९१ ७४४७८ ३३१४२ वर आमच्याशी संपर्क साधा, आम्ही तुमच्या योगाभ्यासात मदत करण्यास उपस्थित आहोत.









Comments

Popular posts from this blog

मातीच्या माठातील पाणी पिण्याचे फायदे

आम्लपित्त उपचार

नारळ पाणी पिण्याचे फायदे नक्की वाचा!