Posts

Showing posts from November, 2019

भूक न लागण्याची कारणे काय?

Image
भूक न लागणे हा प्रकार सामान्य वाटत असेल तरी तो चिंतेचा विषय आहे. भूक न लागण्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यावर एक नजर... 1) आजारी असताना शरिरातील नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीचा जास्त वापर होत असतो. अशात भूक कमी लागते किंवा लागतच नाही. 2) विविध प्रकराची औषधे तुम्ही घेत असला तर औषधामुळे कमी भूक लागते. 3) काही कारणास्तव हृदयाची धडधड वाढली कि, पचनक्रीया मंदावते. त्यामुळे देखील तुम्हाला भूक लागत नाही. 4) व्यक्तीच्या शारीरिक हालचाली, व्यायाम, खेळ, ऋतू, त्याची मानसिक स्थिती इ. गोष्टींवर भूक न लागणे अवलंबूृन असते. 5) पाव-बिस्किटांचा अतिरेकी वापर, कॅटबरी, चॉकलेट यासारखे पदार्थ, थंड पदार्थ अन् थंड पेय यांची सवय, भेळ, फरसाण, वेफर्स यांसारख्या पदार्थांचा वापर आणि मैद्याचे पदार्थ यामुळे पोट साफ होत नाही अन् भूक लागत नाही. 6) अन्ननलिकेतून अन्नपदार्थ सामान्य गतीने पुढे सरकरण्यास अडथळा निर्माण झाला कि, भूक कमी लागते. 7) अधूनमधून सारखे काहीतरी काहीतरी खात राहील्यानेही भूक लागत नाही. त्यामुळे दोन जेवणांमध्ये किमान चार तासांचे अंतर असलेच पाहिजे.

शरीरामध्ये रक्त वाढवण्यासाठी काय करावे?

Image
बऱ्याच माता-भगिनींना, लहान मुलांना आजारानंतर हिमोग्लोबिन ची मात्रा रक्तात कमी होते. अशावेळी अनेक आजारांना सामोरे जावे लागते. माता-भगिनींना मासिकपाळीच्या समस्यांमध्ये रक्त खुप कमी होते अशावेळी 👉 मोड आलेले कडधान्य धान्य खाणे उत्तम. 👉 आहारात सिझनल फळांचा समावेश करा. 👉 गुळ आणि शेंगदाणे एकत्रित खाणे, 👉🏻 राजगिऱ्याचे लाह्या, लाडू, राजगिऱ्याची गुळाची खीर खाणे. 👉 सफरचंद व बीट खावे, डाळिंब खाणे, हळद-रक्त वाढीसाठी गुणकारी आहे 👉 सुकामेवा शेंगदाणे खावे, अंजीर भिजवून खाणे, मक्याचे कणीस खाणे, दूध आणि खजूर, सोयाबीन खावे, पालक अंबाडी चुका तसेच इतर पालेभाज्या बदलून बदलून फळभाज्याचा समावेश आपल्या आहारामध्ये ठेवावा, नियमित खाव्यात.