Posts

शांत झोप लागण्यासाठी...

शांत झोप लागण्यासाठी...  आपल्याला सर्वसाधारणपणे सात तासांची सलग झोप गरजेची असते, पण बऱ्याच जणांना काही कारणामुळे अशी सलग झोप लागत नाही.             काही कारणाने, एखादे टेन्शन, काळजी, भीतीमुळे किंवा अगदी उगाचच सतत मधे मधे जाग येत राहते किंवा काही लोकांना तर मुळातच झोप लागत नाही. आपल्या झोपेवर ताबा मिळवण्यासाठी सवयी, व्यायाम प्रकार आणि आहार कसा असावा हे जाणून घेऊ १) ध्यानधारण करणे झोपेसाठी आयुर्वेदात अनेक उपाय सांगितले आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे ध्यान २) मंत्रोच्चार दिवसातून किमान एकदा तरी ओंकार करावा. यामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्यामुळे आपण आपल्या मनात चालणाऱ्या असंख्य विचार किंवा काळज्यांना दूर थोपवू शकतो. ३) योगासने करणे नियमितपणे योग साधना करणाऱ्या लोकांना झोपेचे कसलेच त्रास होत नाही. दिवसातून किमान वीस मिनिटं योगाची प्रॅक्टिस करून शरीर, मन स्वस्थ ठेवणं हा सवयीचा भाग बनून जातो. ४)मसाज करणे झोपेच्या समस्यांसाठी मसाज हा सुद्धा एक चांगला उपाय आहे. नियमितपणे मसाज केल्याने झोपेचा दर्जा तर सुधारतोच पण मसाजमुळे टेन्शन, स्ट्रे...

मातीच्या माठातील पाणी पिण्याचे फायदे

◼माती म्हणजे अनेक खनिजे आणि पोषक घटकांचा खजिना आहे. आपल्याकडे पूर्वी माठातील पाणी पित होते. आजही बरेच जण माठातील पाणीच पितात. जाणून घेऊया माठातील पाणी पिण्याचे फायदे ◼माती नैसर्गिकरीत्या अल्कलाइन शरीरातील ॲसिडिक वातावरणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. म्हणून शरीराच्या आतील वातावरण ॲसिडिक असण्यापेक्षा अल्कलाइन असेल तर आरोग्य उत्तम राहील. माती ही नैसर्गिकरीत्या अल्कालाइन असते. त्यामुळे मातीच्या माठात ठेवलेल्या पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अल्कलाइन होते, असे डॉक्टर सांगतात. ◼कोणतेही हानिकारक रसायने नाहीत. बहुतांश प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये BPA नावाचे टॉक्सिक केमिकल असते. जे आरोग्याला धोकादायक असतात. म्हणून मातीच्या माठात पाणी ठेवणे अधिक आरोग्यदायी आहे. कारण त्यामुळे पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अधिक आरोग्यदायी बनते. पाणी दूषित होत नाही. ◼नैसर्गिक थंडावा- लहान छिद्र (सच्छिद्र) असलेल्या मातीच्या माठात पाणी नैसर्गिकरित्या थंड होण्यास मदत होते. उन्हाळ्यात खूप वेळ लोडशेडिंग असते किंवा अनेकदा वीजपुरवठा स्थगित होतो. अशावेळी तुमची तहान भागवण्यासाठी तुम्ही फ्रिजमधील थंड पाण्यावर अवलंबून...

तोंडात व्रण, छाले, वेदना असणे

१) धने पाण्यात उकळवून, थंड करून त्याने गुळण्या करा. २) वेलचीचे चूर्ण मधात मिसळून आतून लावा व लाळ गळू द्या. ३) जाईच्या झाडाची पाने चावल्याने छाले बरे होतात. ४) पेरूच्या झाडाची पाने उकळवून त्या पाण्याने गुळण्या कराव्या. ५) हळद पाण्यात घोळून, मग गाळून या पाण्याने गुळण्या करा. ६) खोबरे चावून खावे व लाळ तोंडात फिरवावी. ७) ज्येष्ठमध खावे व याच्या पाण्याने गुळण्याही करा. ८) मध पाण्यात मिसळून गुळण्या करा. ९) तुळशीची दोन-तीन पाने चावून खा. १०) विड्याच्या पानाचा रस काढून, त्यात तूप टाकून तो लेप व्रणांना, छाल्यांना लावा. ११) ग्लिसरिन लावा. १ २) खाण्याच्या पानाचे चूर्ण करून त्यात थोडा मध टाकून हे चाटण तोंडात आतून लावा. वेदना थांबतील. वरील उपायानी नक्कीच आराम पडेल.

सोपे आणि सरळ घरगुती उपचार

Image
  1) कॅन्सर होण्याची भीती वाटते -नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अटॅकची भीती वाटते - नियमित अर्जुनासव किंवा अर्जुनारिष्ट प्या. 3) मुळव्याध होण्याची भीती वाटतेय - दररोज सकाळी हिरव्या पानफुटीची पाने खा. 4) किडनी फेल होण्याची भीती वाटतेय - दररोज सकाळी कोथिंबीरचा रस अनुषापोटी प्या. 5) पित्त होण्याची भीती वाटतेय -नियमित आवळा रस प्या. 6) सर्दी होण्याची भीती वाटतेय - नियमित कोमट पाण्यात हळद टाकुन प्या. 7) टक्कल पडण्याची भीती वाटतेय - वडाच्या पारंब्या खोबरेल तेलात उकळुन गाळुन आंघोळीपुर्वी डोक्याला मालिश करा. 8) दात लवकर पडण्याची भीती वाटतेय - फ्रिज / कुलर मधील पाणी कधीच पिऊ नका. 9) डायबेटीस होण्याची भीती वाटते - तणावमुक्त जीवन जगा, व्यायाम करा. जागरण टाळा. साखर खाणे बंद करा, गुळ खा. 10) भीतीमुळे झोप येत नाही - रात्री जेवणापुर्वी 2 तास आधी अश्वगंधारिष्ट ग्लासभर पाण्यात प्या.

काही साधे घरगुती उपाय (आयुर्वेद)

Image
 

दिवसभर सक्रिय राहण्यासाठी उपयुक्त टिप्स!

Image
आपण आहाराशी निगडित लहान गोष्टींकडे फार लक्ष देत नाही. तसेच अशा बऱ्याच गोष्टी खातो जे आपल्या आरोग्याला फायदेशीर नसतात. चला, तर दिवसभर सक्रिय राहण्यासाठी खालील गोष्टी तुम्हाला मदत करतील... 1. दररोज भरपूर पाणी (तीन ते चार लिटर) प्या, आणि कॅलरी मुक्त गोष्टींचे सेवन करा. 2. सकाळी न्याहारी घ्या. न्याहारी न घेतल्यानं अनेक आजार होऊ शकतात. 3. रात्री स्नॅक्स घेताना जपूनच खा. 4. दिवसभर दोन जेवणाच्या मध्ये किमान चार तासांचे अंतर असू द्यावे. सारखे काही ना काही खाणे टाळा. 5. आहारात प्रथिने समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा. 6. आहारात गरिष्ठ आणि मसालेदार पदार्थ नसावे. 7. खाण्यात लाल, हिरव्या, संत्री रंगाचे पदार्थ आवर्जून घ्या. 8. वजन कमी करण्यासाठी जेवणात मीठ कमी करा. 9. दररोज जेवणापूर्वी कमी कॅलरी असलेले व्हेजिटेबल सूप घ्यावे. यामुळे 20 टक्के कॅलरी कमी खर्च होईल. 10. कॅलरीची संख्या वगळून पोषक घटक असलेला आहार घ्यावा.

सकाळ काही चुकीच्या सवयी - अनेक आजारांना निमंत्रण.

Image
  सकाळी जेव्हा आपण डोळे उघडतो तेव्हा आपले शरीर आणि स्नायू खूप सक्रिय असतात. अशा परिस्थितीत आपण सकाळी शरीराबरोबर जे काही करतो त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. कोणतीही चुकीची सवय बऱ्याच रोगांना कारणीभूत ठरू शकते. सकाळच्या नाष्ट्याचा परिणाम आपल्या वजनावर होतो. याशिवाय काही चुकीच्या सवयींमुळे साखरेच पातळीही अनियंत्रित होते. म्हणून उशीर न करता या चुकीच्या सवयींबद्दल माहिती जाणून घ्या… ▪️नाष्ट्यामध्ये या गोष्टींचा समावेश करू नका- सकाळी घाईघाईत आपण हेल्दी खाण्याव्यतिरिक्त प्रोसेस्ड फुडचा नाष्टा केल्यास आपले वजन अनियंत्रित होऊ शकते. प्रोसेस्ड खाद्यपदार्थांमध्ये वेगवेगळ्या फ्लेवर्सचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. सकाळी जंक फूड खाणे म्हणजे स्वतःच्या आरोग्याशी खेळण्यासारखे आहे. ▪️सकाळी नाष्टा न करणे- असे बरेच लोक आहेत जे घाईघाईत नाष्टा करत नाही, हे लठ्ठपणा वाढवण्याचे सर्वात मोठे कारण आहे. सकाळ नाष्टा केला नाही तर आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते कारण यामुळे आपली पचनक्रियेमध्ये बिघाड होत आणि मग तुम्हाला पोटाच्या समस्या सुरु होतात. ▪️पाणी न पिणे- ...